Paralysis - - Paralysis
- Satish Shindadkar
- Aug 2
- 6 min read
पक्षाघात - - पॅरालिसीस
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - - पक्षाघात म्हणजेच पॅरालिसीस या विषयी बघणार आहोत - - - - - - -
पक्षाघात // पक्षवध // अर्धांग वायू // एकांग वात हे सर्व पर्यायवाची शब्द आहेत असे आपण मानू या - - - -
शरीराच्या अर्ध्या भागात निष्क्रियत्व येणे म्हणजे अर्धांगवात किंवा पक्षाघात होय - - - -शरीराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूचे अर्धे अंग पूर्णतः निष्क्रिय होते - - - लुळे पडते आणि म्हणून त्या बाजूच्या हालचाली पूर्णतः नष्ट होतात - - - - हे अर्धांग वायूचे प्रमुख लक्षण असते
रुक्ष म्हणजे कोरडे पदार्थ - - - सोडा असणारे पदार्थ - - - कडू // तिखट // तुरट अधिक प्रमाणात - - - नेहमी सेवन करणे - - - अति जागरण - - - अति प्रमाणात आणि अयोग्यवेळी पंचकर्म करणे - - - अति व्यायाम जसे पोहणे चालणे इत्यादी - - - अति श्रम - अति चिंता - - एखाद्या मोठ्या आजारानंतर येणारा थकवा आणि वातदोष वाढणे - - - शिंक // संडास // लघवी इत्यादींना रोखणे - - - - शरीरावर विशेषतः डोक्याला मार लागणे इत्यादी कारणांनी शरीरात वात दोष वाढतो - - - तसेच निसर्गतः वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा - - - अन्नाचे पचन झाल्यानंतर पहाटे आणि सायंकाळच्या प्रथम प्रहरी स्वभावतः शरीरात वात दोष वाढलेला असतो - - - - आहार विहारातील कारण आणि शरीरात निसर्गत: स्वभाव गुणांनी वात वाढण्याच्या काळात - - - पक्षाघाताचा आजार उद्भवण्याची शक्यता अधिक असते.
अशा प्रकारे वातदोष वाढवणाऱ्या कारणांनी प्रकुपित झालेला वातदोष - - - - शरीराच्या अर्ध्या भागात संचार करून त्या भागातील शिरा आणि स्नायू यांना शुष्क करतो - - -- सांध्यांची बंधने शिथिल होतात आणि शरीर अवयव लुळे पडतात - - - - - आपल्या शरीराचे नियंत्रण त्या भागावर न राहिल्याने - - - - - हातपाय हलविणे अशक्य होते - - - - बोलणे अस्पष्ट होते - - - - मल मूत्र यावर देखील नियंत्रण नष्ट होते
अर्धांग वायूमध्ये एका बाजूच्या हात पाय यांच्यात विकृती - - - - सोबत चेहऱ्याचा देखील अर्धा भाग विकृत होऊ शकतो - - - - प्रत्येक रुग्णांमध्ये असे होईलच असे नाही - - - - काही रुग्णांमध्ये केवळ चेहऱ्याच्या एका बाजूला ही लक्षणे दिसतात - - - - - हात पाय या ठिकाणी निष्क्रियत्व नसते - - - तेव्हा याला अर्दित म्हणजेच फेशियल पॅरॅलिसिस असे म्हणतात
पक्षाघात हा खरे पाहता अत्यंत क्लिष्ट व्याधी असून - - - चिकाटी आणि पथ्या पथ्यद्वारे बरा होऊ शकतो - - - - अनेक रुग्णांमध्ये काही लक्षणे कमी होतात तर काही उणीवा शरीरात कायम स्वरूपी शिल्लक राहतात
चिकित्सेचा विचार करतांना यात प्रामुख्याने मालीश क्रियेचा उल्लेख प्रथम करणे आवश्यक वाटते - - - - विविध औषधी तेलाची मालिश यामध्ये हितकर असते - - - - मालिश साठी महानारायण तेल - - - - - नागफणी तेल - - बला तेल - - - पंचगुण तेल - - एरंड तेल यांचा वापर करता येतो - - - - पंचकर्मामध्ये बस्ती ही क्रिया वात दोषास कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि श्रेष्ठ असते - - - बस्ती हा प्रकार वैद्यच्या मार्गदर्शनामध्येच करावा - - - तसेच मालिश म्हणजे अभ्यंग हा प्रकार देखील तज्ञ व्यक्तीकडूनच करणे उत्तम असते - - - बस्ती आणि मालिश याद्वारे शरीरातील काही भागांचे निष्क्रियत्व कमी करता येते - - - विविध औषधांमध्ये महायोगराज गुगुळ - - - महावात विध्वंस रस - - - एकांगवीर रस बृहतवात चिंतामणी - - - कवच बीज - - - अश्वगंधा - - - दशमुलारिष्ट - - - महारास्नादी काढा - - - - - इत्यादींचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा
पथ्य अपथ्य पालन हे या व्याधीत अत्यंत आवश्यक बाब आहे - - - - पचण्यास हलका आहार - - - - गाईचे दूध तूप लोणी - - - मुगडाळ - - ज्वारी बाजरी गहू - - - जुना तांदूळ इत्यादी घ्यावे
फळांमध्ये द्राक्ष - - - मनुका - अंजीर - - आवळा - - पपई - - अननस इत्यादी घ्यावे भाज्यांमध्ये मेथी - - - गिलके - दोडके - कारले - भोपळा - गंगाफळ इत्यादी द्यावेत - - शक्यतो दही - - - क्षारयुक्त पदार्थ - - - पचण्यास जड पदार्थ - - - तुरट पदार्थ आणि चिंता इ. वर्ज्य कराव्यात
पक्षाघात हा आजार पूर्वीच्या काळी कमी प्रमाणात आढळत होता - - - - परंतु सध्याच्या जीवनशैलीच्या दृष्टीने हा अधिक प्रमाणामध्ये आढळून येत आहे - - - - म्हणून प्रत्येक मनुष्याने शरीरात वातदोष वाढणार नाही अशी काळजी घ्यावी
Paralysis - - Paralysis
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to discuss - - - - - paralysis - - - - - - -
Paralysis // Pakshavadha // Hemiplegia // Ekanga Vata are all considered synonymous terms - - - -
Loss of function in one half of the body is called hemiplegia or paralysis - - - - One half of the body, either the right or the left side, becomes completely inactive - - - It becomes limp, and therefore all movements on that side are completely lost - - - - This is the main symptom of hemiplegia.
Dry foods - - - foods containing soda - - - excessive consumption of bitter // spicy // astringent foods - - - habitual intake - - - excessive staying awake at night - - - undergoing Panchakarma excessively or at inappropriate times - - - excessive exercise such as swimming, walking, etc. - - - excessive physical exertion - excessive worry - - fatigue following a major illness and aggravation of the Vata dosha - - suppressing sneezing // bowel movements // urination, etc. - - - injuries to the body, especially to the head, and similar causes increase the Vata dosha in the body - - - Also, naturally during the rainy season - - - after food has been digested, during early morning and the first part of the evening, the Vata dosha naturally increases in the body - - - - Due to dietary and lifestyle factors, and during the periods when Vata naturally increases because of its inherent qualities - - - the likelihood of developing paralysis is higher.
In this way, the aggravated Vata dosha caused by factors that increase Vata - - - - spreads to one half of the body and dries up the veins and muscles in that area - - - the ligaments of the joints become loose, and the body parts become limp - - - - - since the body loses control over that part - - - - - it becomes impossible to move the hands and legs - - - - speech becomes unclear - - - - control over bowel and bladder functions is also lost.
In hemiplegia, along with deformity or impairment in the hand and leg on one side - - - - half of the face may also become affected - - - - However, this does not occur in every patient - - - - In some patients, these symptoms appear only on one side of the face - - - - - there is no inactivity in the hands and legs - - - In such cases, it is called Ardita, that is, facial paralysis.
In reality, paralysis is a highly complex disease - - - - It can improve with perseverance and proper dietary and lifestyle discipline - - - - In many patients, some symptoms reduce, while some deficits remain permanently.
While considering treatment, it is important to first mention massage therapy - - - - Massage with various medicated oils is beneficial - - - - Oils such as Mahanarayana oil - - - Nagphani oil - - Bala oil - - Panchaguna oil - - Castor oil can be used - - - - Among Panchakarma therapies, Basti (medicated enema) is the most important and superior treatment for reducing Vata dosha - - - Basti should only be performed under the guidance of an Ayurvedic physician - - - Likewise, massage (Abhyanga) should also be done only by a trained expert - - - Through Basti and massage, the inactivity of certain body parts can be reduced - - - Various medicines such as Mahayogaraj Guggulu - - - Mahavat Vidhwans Ras - - Ekangveer Ras - Brihat Vata Chintamani - - - Kapikacchu seeds - - - Ashwagandha - - - Dashamularishta - - - Maharasnadi decoction - - - - - etc. should be taken only under medical supervision.
Following the recommended and avoiding the prohibited diet is extremely important in this disease - - - - Eat easily digestible food - - - - Cow's milk, ghee, butter - - - green gram (mung dal) - - sorghum, pearl millet, wheat - - - aged rice, etc. should be consumed.
Among fruits, grapes - - - raisins - - figs - - Indian gooseberry (amla) - - papaya - - pineapple, etc. should be eaten. Among vegetables, fenugreek - - - ridge gourd - - sponge gourd - - bitter gourd - - pumpkin - - Gangaphal, etc. should be consumed - - If possible, avoid curd - - - alkaline foods - - - heavy-to-digest foods - - - astringent foods, and excessive worry.
In the past, paralysis was seen less frequently - - - - However, with today's lifestyle, it is occurring more commonly - - - - Therefore, every person should take care to prevent an increase in the Vata dosha in the body.

Comments